मुंबई : १६ आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या १६ आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नसून विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निर्णय दिलेला आहे. या प्रकरणाचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा असे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या प्रकरणाचा निकाल देणार आहेत. त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार नाही हे नक्की झालंय. खरी शिवसेना कोण याचा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.
लोणावळा : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले), रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा...
Read more